पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता.
पुढे सहा सात वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे.
जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल
अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.
पास / नापास हेच आम्हाला कळत होतं...
टक्केवारी आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.😆
शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हीणवलं जायचं...🤣
पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपीस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...😏
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या
पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता
हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी,
पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे,
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव
असायचा...🤗
वर्ष संपल्यावर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात
आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 😝
आईवडिलांना आमचे शिक्षण म्हणजे
त्यांच्यावर बोजा असेही नव्हते.🙂
कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर
व दुसऱ्याला मागच्या carrierवर बसवून,
आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...🤭
सरांचा शाळेत मार खाताना
आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना,
कान लाल होऊन पिरगळला जाताना
आमचा 'इगो' कधीही आडवा येत नव्हता,
खरं तर आम्हाला 'इगो' काय असतो,
हेच माहीत नव्हतं...😀
मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील
एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा
दोघेही खूष असायचे.
मार खाणारा यासाठी की,
'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो
म्हणून' आणि मारणारा
'आज पुन्हा हात धुवून
घ्यायला मिळाले म्हणून......' 😂
बिनचपला, बूटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी
बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट
खेळण्यातले काय सुख होते,
ते आम्हालाच माहीत होते.
आम्ही पॉकेटमनी कधीच मागितला नाही,
आणि वडिलांनी कधी दिला नाही.
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या.
छोट्याशा असल्याच तर घरातले
कोणीतरी पूर्ण करून टाकायचे.
सहा महिन्यातून चिरमुरे फरसाण खायला
मिळालाच तरी आम्ही बेहद खूश होतो.🤣
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून
एकेक फटका उडवत बसणे यात काही
अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.
कोणी दुसरा फटाके फोडत असेल
त्याच्या मागे मागे धावायचो.🏃♂️
आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो,
कारण आम्हाला 'आय लव यू'
म्हणणं माहीतच नव्हतं...😘
आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात,
संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय.
काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काहींना काय माहीत....? 😇
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीटवर फिरवलेले,
स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून
काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,
कुठे हरवलेत ते...! 😌
आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत
जगलो, आणि वास्तवात
वाढलो........!
कपड्यांना सुरकुत्या पडू
न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं
आम्हाला कधी जमलंच नाही.
भाकरी आणि भाजीशिवाय मधल्या सुटीतला काही
डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.🍲
आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता
आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय.
कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.
जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी
काहीच तुलना होणार नाही.....! 🌿
आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण
आमचाही एक 'जमाना' होता.....🦚
🌱
एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले :
"तुम्ही लोक आधी कसे जगत होता हो ?
तंत्रज्ञानात प्रवेश नाही, विमाने नाहीत
इंटरनेट नाही, संगणक नाहीत
नाटके नाहीत, टीव्ही नाहीत
गाड्या नाहीत, मोबाईल फोन नाहीत ?"
त्याच्या वडिलांनी उत्तर दिले :
"आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याचप्रमाणे,
भक्ती नाही, ज्ञान नाही
संत माहीत नाहीत, ग्रंथ माहीत नाहीत
शांती नाही, संयम नाही
धर्मनिष्ठा नाही, कुळधर्म-कुळाचार नाही
प्रार्थना नाहीत, शाकाहार नाही
सण-उत्सव नाही, करुणा नाही
सन्मान नाही, आदर नाही
आदर्श नाहीत, लाज नाही
नातीगोती नाहीत, नम्रता नाही
आरोग्याचे भान नाही, वेळेची जाण नाही
खेळ नाही, वाचन नाही
सेवाभाव नाही."
आम्ही, १९५० ते १९८० दरम्यान जन्मलेले लोक आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे.
👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.
👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.
👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.
👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.
👉 आम्ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.
👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.
👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.
👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.
👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.
👉 आमचे आईवडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.
👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते, पण आमचे खरे मित्र होते.
👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.
👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.
आम्ही एक अद्वितीय आणि सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले.
तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले. 😂
आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत...!
शेवटी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....!
🦋
No comments:
Post a Comment