Friday, December 29, 2023

अडगळीत गेलेले शब्द....!

अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द

ऑफिस मधून घरी आलो तर मुलगी क्राफ्ट चा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी  करत होती.
म्हंटलं "काय गं अशी फतकल मारून बसलीस मधेच!”
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?
फतकल ??? 

मध्ये बहिणीकडे गेलो असताना भाचीला म्हंटलं, "माझी बॅग जरा खुंटीला लटकवून ठेव.” तर फिदीफिदी हसली,
म्हणते "शी s s खुंटी ?"
What’s that?”

आता काय सांगू तिला. माझा जन्म आमच्या वाड्यात झाला, त्यामुळे खुंटी, कोनाडा, फडताळ, ओगराळ, रोळी, घंगाळं,
ओटी, परसदार, माडी, पोटमाळा हे रोजच्या वापरातील शब्द होते.

किती उशीर झाला रे शिऱ्या, दिवा “मालव” आता. असं आज्जी हमखास म्हणायची. कोकणात दिवा दवड म्हणतात.
जेवताना आजी नेहमी “गोविंद” (एक घास) काढून ठेवायची.

हल्ली…..
वाती “वळायच्या” नसतात तर विकत मिळतात.
जेवणाचं “पान” वाढायचे नसते तर serve करायचे असते.
भात वाढ म्हणायचे नसते तर भात दे म्हणायचे असते.
देवघरातील वात “शांत” करायची नसते तर विझवायची असते.

चंदनाचे खोड आणि सहाणे ची जागा रेडिमेड गंधाच्या खडूने घेतलीय. पिंजरीची जागा टिकली न घेतलीय. बुश शर्ट ची जागा टी शर्ट ने घेतलीय. नऊवारी लुगड्याची जागा शिवलेल्या “saree” नं घेतलीय.

खाण्याची “बशी” नसते तर प्लेट/डिश असते.
चहाची बशी हा प्रकार तर इतिहास जमा झालाय.
थालीपीठ थापायला पळसाचे/केळीच पान नसतं तर प्लास्टिक शीट असते. ते भाजायला बिडाची काहिल जाऊन नॉनस्टिक तवा आलाय. कात्रीची सीझर झालीय, तर शिवण यंत्र sewing machine झालंय.

मूळात शीर्षक दिसताच लक्षात येते की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या... 

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.  ‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.

घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.
पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात; ती पागोळी.

‘फडताळ’… फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.
जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली. लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.

‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो, पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले. कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे त्या गडप झाल्या. सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, मडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.
बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पानपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.
उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा, त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. ही पण अडगळीतील नावे आहेत …

लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले.
काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच…! 

काही अडगळीत मावळत चाललेले मराठी शब्द

तांबडं, कडूसं, येरवाळी, इदुळा, आवसं, पारुख, घटका, पळे, औंदा, यंदा, परूस, टिच, इत, हात, वाव, काखवाव,  मैल, फर्लांग, मोगली, कुड, बारव, आड, कनिंग, कनगुलं, डुरकुलं, झाप, डालगं, दुरडी, परडी, टोपलं, तिकाटनं, मेडकं, आडू, वलन, वासा, भानुसा, खुराडा, आंगण, वटा, रांजण, सारवण, पोतारा, वळचण, पागोळ्या, कलवड, सूरपारंबा, विटी-दांडू, लोम्पाट, हुतुतू, शिवनाभानी, दस्ताडपुगडं, लंगडी, जिबल्या, चुळचुळमुंगळा, आकरा टोकरा, आईचं पत्र हरवलंय, माचाळ, पोहरा, कोरड्यास, कालवण, घासलेट, टकूचं, कुंची, शेलकाट, पैरण, बाराबंदी, आंगरटं, छाटण, मुडासं, पटका, टोपी, लुगडं, चोळी, पोलकं, फडका, गवन,  कांबळ, वाकळ, घोंगडं, लेपाटं, पासोडी, रकटं, चादर, वाकी, मासोळी, बाळी, भिकबाळी, बुगडी, बिंदली, कुडकी, वजरटीक, सर, कमरपट्टा, करदुडा, तोडा, वाळा, औत, कुळव, फरांडी, डुबं, तिफण, चाडं, नळं, जानवळं, इळत, इडी, दिंड, फाळ, फारुळं, रुमणं, शीवळ, जु, कुरडिकं, खिळ, सापती, कुळव, पास, दातुळ, काडवान, आवूड, बराड, काकरी, मुरडान, तास, आडतास, वसान,  दोरकांड, दावं, कानी, कासरा, चऱ्हाट, चिलबल, बिरडं, येटान, बुटयेटान, आक्री, आक, तुंबा, आरा, पुट्टा, कुनी, धाव, डोंबाळा, घोडकं, ढकली, खुटला, पाटली, शिड्या, मुंगा, खोडकी, ढोणगी, चारबैली, सहाबैली, हाताळी, वेसण, म्होरकी, चौरी, माचाटी, झुली, मुंगसं, चावऱ्या, छकडा, नळा, राखोळी, वळती, आटोळा, गोफण, पिचका, बुजगावणं, कुडी, गांजवा, चुकारी, उतार्‍या, अर्धली, करडू, ताटली, परात, तंबुलं, लोटकं, तवली, भगोनं, हांडा, घंगाळं, चरवी, गुंडगी, चमचा, वग्राळं, पळी, चाटू, कावळा, वाडगा, परात, पितळी, वाटी, तांब्या, पेला, गडू, गडवा, चंबू, किटली, खिसनी, गाळणी, शेवगा, झाऱ्या, सांडशी, चिमटा, काठवट, बेलणं, उखळ, ठोंबा, मुसळ, सूप, जातं, खुटा,  पाटा, वरवंटा, कंदिल, चिमणी, टाक, दौत, शाई, पत्र, टिप कागद, इळा, खुरपं, कोयतं, नारगत, भाला, खलबत्ता, शेम्ब्या, झूल, वाळंन, फुकारी, दिवळी, फरताळ, तुळई, किलचान, हालकडी, आडू, सवनं, माचाड, वरवटा, बाजवा, आड्याळं, दंड्याळं, लाखान, मिट्या, आसूड, इळत, वडवान, मोट, नाडा, सोंदुर, चाक, कणा, कणंपट्टी, चाकपट्टी, फावडं, घमेलं, कुऱ्हाड, कुदळ, सांगुळा, थारुळा, हौद, हेळ, मोगळा, पाचुंदा, पलान, दंड, आटवनी, आवातनं, न्याहारी, वानवळा, भलरी, काढणी, मळणी, बडवणी,  बुचाड, खळं, माजनं, ढवरा, भंडारा, रास, मदान, वावडी, हातनी, वाफा, सरी, वरंबा, सारा, वसारी, आमुनं, इर्जिक, सांगड, पैरा, शेम्ब्या, झूल, चंगाळं, फुकारी, मोगा, मोरवा, झाकणी, सुगाड, शेर, आटवा, चिपटं, मापटं, कोळवं, नीळवं, खंडी, मण,पसा, वंजळ, भारा, उतरंड, ढेपन, आळी, चावडी,  गावपांढर, शीव, गावकूस.

विचार करा यातील किती शब्द आजकल वापरले जातात व आपल्या पुढील पिढीपर्यंत किती शब्द पोचतील.
                                                               
                                       🪴

Monday, December 25, 2023

गेले ते दिवस...!

आमचाही एक जमाना होता
पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. 
पुढे सहा सात वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे. 
जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल 
अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.
पास / नापास हेच आम्हाला कळत होतं...
टक्केवारी आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.😆

शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हीणवलं जायचं...🤣

पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपीस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...😏

कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या 
पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता 
हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, 
पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे,
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव
असायचा...🤗

वर्ष संपल्यावर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात 
आम्हाला काहीही लाज वाटत नसे. 😝

आईवडिलांना आमचे शिक्षण म्हणजे 
त्यांच्यावर बोजा असेही नव्हते.🙂

कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर 
व दुसऱ्याला मागच्या carrierवर बसवून, 
आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...🤭

सरांचा शाळेत मार खाताना
आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना, 
कान लाल होऊन पिरगळला जाताना 
आमचा 'इगो' कधीही आडवा येत नव्हता, 
खरं तर आम्हाला 'इगो' काय असतो, 
हेच माहीत नव्हतं...😀

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील 
एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा
दोघेही खूष असायचे.
मार खाणारा यासाठी की,
'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो
म्हणून' आणि मारणारा
'आज पुन्हा हात धुवून
घ्यायला मिळाले म्हणून......' 😂

बिनचपला, बूटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी 
बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट
खेळण्यातले काय सुख होते, 
ते आम्हालाच माहीत होते.
आम्ही पॉकेटमनी कधीच मागितला नाही, 
आणि वडिलांनी कधी दिला नाही.
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. 
छोट्याशा असल्याच तर घरातले 
कोणीतरी पूर्ण करून टाकायचे. 
सहा महिन्यातून चिरमुरे फरसाण खायला 
मिळालाच तरी आम्ही बेहद खूश होतो.🤣

दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून 
एकेक फटका उडवत बसणे यात काही 
अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही. 
कोणी दुसरा फटाके फोडत असेल 
त्याच्या मागे मागे धावायचो.🏃‍♂️

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, 
कारण आम्हाला 'आय लव यू'
म्हणणं माहीतच नव्हतं...😘

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, 
संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. 
काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काहींना काय माहीत....? 😇

शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीटवर फिरवलेले, 
स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून 
काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,
कुठे हरवलेत ते...! 😌

आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत
जगलो, आणि वास्तवात
वाढलो........! 

कपड्यांना सुरकुत्या पडू
न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं
आम्हाला कधी जमलंच नाही. 
भाकरी आणि भाजीशिवाय मधल्या सुटीतला काही 
डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.🍲

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता 
आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. 
कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत. 
जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी 
काहीच तुलना होणार नाही.....! 🌿

आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण
आमचाही एक 'जमाना' होता.....🦚

🌱
एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले :

"तुम्ही लोक आधी कसे जगत होता हो ?
तंत्रज्ञानात प्रवेश नाही, विमाने नाहीत
इंटरनेट नाही, संगणक नाहीत
नाटके नाहीत, टीव्ही नाहीत
गाड्या नाहीत, मोबाईल फोन नाहीत ?"

त्याच्या वडिलांनी उत्तर दिले :

"आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याचप्रमाणे,
भक्ती नाही, ज्ञान नाही
संत माहीत नाहीत, ग्रंथ माहीत नाहीत
शांती नाही, संयम नाही
धर्मनिष्ठा नाही, कुळधर्म-कुळाचार नाही
प्रार्थना नाहीत, शाकाहार नाही
सण-उत्सव नाही, करुणा नाही
सन्मान नाही, आदर नाही
आदर्श नाहीत, लाज नाही
नातीगोती नाहीत, नम्रता नाही
आरोग्याचे भान नाही, वेळेची जाण नाही
खेळ नाही, वाचन नाही
सेवाभाव नाही."

आम्ही, १९५० ते १९८० दरम्यान जन्मलेले लोक आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे.

👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.
👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो. आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.
👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.
👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.
👉 आम्‍ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्‍ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.
👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.
👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.
👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.
👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.
👉 आमचे आईवडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.
👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते, पण आमचे खरे मित्र होते.
👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.
👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.

आम्ही एक अद्वितीय आणि सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले.

तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले. 😂

आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत...!

शेवटी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....!

                                      🦋